Manasvi Choudhary
हिवाळ्यात तुरीच्या शेंगा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानल्या जातात. हिवाळ्यात शरीराला ऊर्जा व उष्णता देतात.
तुरीच्या डाळीपेक्षा शेंगा पचायला सोप्या असतात. उकडलेल्या तुरीच्या शेंगा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते.
हिवाळ्यात शरीराचा थकवा दूर करण्यासाठी तुरीच्या शेंगा फायद्याच्या आहेत.
तुरीच्या शेंगामध्ये फायबर असते यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
मधुमेहाच्या रूग्णांसाठी तुरीच्या शेंगा गुणकारी आहेत तुरीच्या शेंगा खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
तुरीच्या शेंगा प्रथिनांनी समृद्ध असतात ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.