Surabhi Jayashree Jagdish
आजारी असणाऱ्या व्यक्तींना डॉक्टर सामान्यपणे नारळपाणी पिण्याचा सल्ला देतात.
दिवसातून चार वेळा नारळपाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होऊ शकतात.
नारळपाणी हे एक नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स, जीवनसत्त्वे आणि पोषक घटकांनी परिपूर्ण पेय आहे.
नारळपाणी शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. हे साध्या पाण्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे शरीराला हायड्रेट ठेवते.
नारळपाण्यात फायबर आणि बायोएक्टिव्ह एन्झाइम्स असतात, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.
नियमित सेवनाने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
इतर गोड पेयांच्या तुलनेत नारळपाण्यात कॅलरीज आणि साखर कमी असते. यामुळे ते वजन कमी करण्यासाठी एक चांगला पर्याय ठरते.
नारळपाणी शरीरातील विषारी पदार्थ आणि अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यास मदत करते. हे किडनी स्टोन तयार होण्याचा धोका कमी करू शकते