Surabhi Jayashree Jagdish
छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची प्रतापगडावर झालेली भेट इतिहासातील अत्यंत निर्णायक घटना मानली जाते. गळाभेटीच्या वेळी अफजलखानाने कपट करून खंजीराने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवाजी महाराजांनी तत्काळ वाघनखे आणि बिछव्यांनी प्रतिकार केला.
प्रतापगडाच्या पायथ्याशी दोघांची गळाभेट झाली तेव्हा वातावरण शांत असल्याचं भासवण्यात आलं होतं. अफजलखानाने अचानक शिवाजी महाराजांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला.
अफजलखानाचा वार होताच छत्रपती शिवाजी महाराजांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला उत्तर दिलं. महाराजांच्या हातात असलेल्या वाघनखांनी त्यांनी अफजलखानावर जोरदार वार केला. हा वार त्याच्यासाठी अनपेक्षित होता.
शिवाजी महाराजांच्या प्रत्युत्तराने अफजलखान गोंधळून गेला. त्याने लगेचच आपल्या सैनिकांना मदतीसाठी हाक मारली. “लढा! लढा! तलवार! तलवार! तलवार घ्या मला!” असं तो ओरडल्याचं वर्णन आढळतं.
अफजल खानाला गंभीर जखमा झाल्यानंतर त्याने शेवटचे शब्द उच्चारले. “याने मला मारले! या शत्रूला तात्काळ ठार मारा!” असं तो ओरडत होता.
अफजलखानाच्या शेवटच्या शब्दांची माहिती ही श्री शिवभारतमधील श्लोकांतून घेण्यात आलेली आहे. त्यामुळे हे संवाद परंपरेतून प्रचलित झालेले असल्याचं मानलं जातं.