Surabhi Jayashree Jagdish
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जाणून घ्यायला आपल्या प्रत्येकाला आवडतं. अनेकांना शिवाजी महाराजांच्या आहाराविषयी जाणून घ्यायची फार उत्सुकता असते.
अगदी जुन्या काळात आजच्या प्रमाणात मिरची नव्हती. मात्र तरीही जेवणात तिखट चव आणण्यासाठी विविध नैसर्गिक मसाल्यांचा वापर केला जात होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लोकांचा आहार साधा पण चविष्ट होता आणि ते मसाले जेवणाला स्वाद देत होते.
महाराजांच्या काळात चवदार पदार्थासाठी काळी मिरी हा मुख्य मसाला होता. मिरची भारतात नव्हती तरी मिरीची तिखटपणा देणारी चव उपलब्ध होती. ही मिरी स्वयंपाकात तिखटपणासाठी वापरली जात होती.
त्या काळात आलं हे मसाला आणि औषध दोन्ही म्हणून महत्त्वाचं होतं. याची तिखट चव अन्नाला स्वाद देत होती. आलं आहारात नियमित समाविष्ट केलं जायचं.
लसूणही तिखटपणा आणि सुगंध देणारा घटक म्हणून स्वयंपाकात त्याचा वापर केला जात होता. लसूण नैसर्गिक चव वाढवणारी म्हणून काम करत होती. लसूणाच्या तुकड्यांचा अनेक पदार्थात वापर केला जायचा.
छत्रपतींच्या काळात लाल मिरची भारतात नव्हती कारण तिचा उगम दक्षिण अमेरिकेत झाला होता. ही मिरची पोर्तुगालच्या व्यापाऱ्यांद्वारे भारतात आली. त्यामुळे शिवकाळात मिरची फारशी वापरात नव्हती.
मसाल्यांमध्ये मिरी, आलं, लसूण हे स्थानिक आणि नैसर्गिकरित्या उपलब्ध होते. ही मसाले अन्नाचा स्वाद वाढवण्यासाठी वापरले जात असतं. हे मसाले शरीराला उष्णता आणि पचनास मदतही करत होते.