ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतात वेगवेगळ्या धर्माचे, भाषा बोलणारे लोकं राहातात. प्रत्येक धर्माच्या काही रुढी आणि परंपरा असतात ज्या पिढ्यांपिढ्या चालत येतात.
हिंदू धर्मामध्ये लग्नाला अतिश्य पवित्र समारंभ मानलं जातं. भारतात लग्न सोहळा एकदम दणक्यात साजरा कला जातो.
लग्न लागल्यावर सप्तपदीदरम्यान एक महत्त्वाची विधी केली जाते. या विधीमध्ये नववधूच्या पायामध्ये चांदीच्या जोडवी घातली जातात.
हिंदू महिला लग्नानंतर आयुष्यभर ही जोडवी आपल्या पायात परिधान करतात.
पायात जोडवी घालणे अत्यंत शुभ मानलं जातं. जोडवी महिलेला आपल्या पतीशी जोडून ठेवतं.
ज्या बोटाट जोडवी घालतात त्या बोटाची नस महिलेच्या हृदयाशी आणि गर्भशयाशी जोडलेली असतात.
जोडवी घातल्यामुळे नसांमध्ये रक्त प्रवाह सुरळीत होतो. अनियमित पाळी संबंधीत समस्या देखील कमी होतात.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.