Shruti Vilas Kadam
दिवसभराच्या कामानंतर कोमट पाण्याने आंघोळ केल्याने स्नायू सैल होतात आणि मन शांत होते. त्यामुळे ताणतणाव दूर होण्यास मदत मिळते.
कोमट पाणी शरीराचे तापमान संतुलित ठेवते. त्यामुळे शरीर रिलॅक्स होऊन झोप लवकर लागते आणि अनिद्रेचा त्रास कमी होतो.
कोमट पाण्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे स्नायू आखडणे, पाठदुखी व सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
रात्री कोमट पाण्याने आंघोळ केल्याने वाफेचा परिणाम होतो. त्यामुळे नाक मोकळे होते आणि कफ सैल होऊन सर्दी-खोकल्याचा त्रास कमी होतो.
थंड पाण्यापेक्षा कोमट पाणी त्वचेसाठी अधिक फायदेशीर ठरते. यामुळे त्वचा कोरडी पडत नाही आणि खाज-जळजळ कमी होते.
कोमट पाण्याने आंघोळ केल्याने रक्तवाहिन्या सैल होतात. त्यामुळे उच्च रक्तदाबामुळे येणारी अस्वस्थता काही प्रमाणात कमी होऊ शकते.
दिवसभराचा शारीरिक थकवा कोमट पाण्याने आंघोळ केल्याने पटकन उतरतो आणि शरीराला ताजेतवानेपणा मिळतो.