Palghar Tourism: एका दिवसाच्या सुट्टीत लोणावळा-खंडाळ्याचा फील घ्यायचाच? पालघरजवळचे 'हे' Hidden sport नक्की फिरून या

Surabhi Jayashree Jagdish

पालघर

पालघर जिल्हा मुंबईजवळ असल्यामुळे आणि त्याला मोठी किनारपट्टी लाभल्यामुळे याठिकाणी किल्ले, मंदिरे आणि समुद्रकिनारे यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो.

वसई किल्ला

हा किल्ला पोर्तुगीज आणि मराठा साम्राज्याच्या संघर्षाचा साक्षीदार आहे. याच्या भव्य तटबंदी आणि चर्चच्या अवशेषांमुळे हे ठिकाण Photography साठी अत्यंत प्रसिद्ध आहे.

अर्नाळा किल्ला

हा किल्ला अर्नाळा बेटावर असून, किनाऱ्यावरून बोटीने इथे पोहोचता येते. मराठा, पोर्तुगीज आणि वसईच्या राजांनी तो वापरला होता. समुद्राने वेढलेला आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा जलदुर्ग इतिहासप्रेमींना आकर्षित करतो.

केळवा बीच

हा किनारा शांत, स्वच्छ आणि नारळी-पोफळीच्या बागांनी वेढलेला आहे. इथले स्थानिक खाद्यपदार्थ आणि किनाऱ्याजवळ असलेला एक छोटा किल्ला (Kelve Fort) पर्यटकांना आकर्षित करतो.

शीतळा देवी मंदिर

पालघर शहराच्या जवळ असलेलं हे मंदिर शांत आणि निसर्गरम्य वातावरणात वसलेलं आहे. हे स्थान स्थानिक भाविकांसाठी विशेष श्रद्धेचं केंद्र आहे. जुन्या मंदिराच्या रचनेमुळे इथे एक आध्यात्मिक शांतता अनुभवता येते.

शिरगाव किल्ला

पोर्तुगीजांनी समुद्री मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा छोटा किल्ला बांधला होता. इथून किनाऱ्याचे दृश्य आणि समुद्राची शांतता अनुभवता येते. फारसा प्रसिद्ध नसलेला हा किल्ला इतिहास आणि शांतता शोधणाऱ्यांसाठी उत्तम आहे.

दातीवरे किनारा

पालघरमधील हा किनारा अजूनही फारसा विकसित झालेला नाही, त्यामुळे तो आपली नैसर्गिक आणि शांत ओळख टिकवून आहे. इथे तुम्हाला मच्छीमारांची वस्ती आणि त्यांच्या जीवनशैलीचे दर्शन होते.

Sindhudurg Tourism: सिंधुदूर्गात लपलेला शिवकाळातील दुर्मिळ किल्ला! महाराजांच्या साम्राज्यातील गुप्त रणनीतीस्थळ

Sindhudurg Tourism | saam tv
येथे क्लिक करा