Sakshi Sunil Jadhav
ढगाळ किंवा पावसाळी वातावरण असलं तरी सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. UV किरणांमुळे टॅनिंग, पिग्मेंटेशन आणि अॅन्टीएजिंगच्या समस्या वाढू शकतात.
पुरेसं पाणी पिणं त्वचेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर त्वचा ड्राय, निस्तेज आणि थकलेली दिसू शकते.
जास्त प्रमाणात चहा, कॉफी किंवा मद्यपान केल्याने शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. त्यामुळे त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवणं कठीण होतं.
व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि त्वचेच्या पेशींना जास्त पोषण मिळतं. त्यामुळे त्वचा जास्त ग्लोइंग दिसते.
दिवसभर अॅक्टीव्ह राहिल्याने शरीर आणि त्वचा दोन्ही निरोगी राहतात. त्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते.
जास्त तणावाचा परिणाम त्वचेच्या पोतावर आणि सौंदर्यावर होऊ शकतो. त्यामुळे ध्यान, योग किंवा आवडत्या गोष्टींसाठी वेळ देणं फायदेशीर ठरू शकतं.
नियमित विश्रांती आणि सेल्फ-केअरमुळे मानसिक आरोग्यातही सुधारणा होते. त्याचा सकारात्मक परिणाम त्वचेवर लगेचच दिसतो.
फक्त पाणी पिणंच नाही, तर चांगला फॅट्सयुक्त आहार घेणंही महत्त्वाचं आहे. हे त्वचेला आतून मॉइश्चराइज ठेवण्याचं काम करतं.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.