Shreya Maskar
विशाळगड हा कोल्हापूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे, जो मराठा साम्राज्याचा महत्त्वाचा बालेकिल्ला होता.
विशाळगड समुद्रसपाटीपासून ३,५०० फूट उंचीवर आहे. हा किल्ला पावनखिंडीच्या लढाईसाठी प्रसिद्ध आहे. विशाळगड हा मराठा साम्राज्याचा एक महत्त्वाचा लष्करी तळ होता.
विशाळगड मराठा इतिहासातील शौर्य आणि संघर्षाचे प्रतीक मानला जातो. पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुखरूप बाहेर पडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना विशाळगडावर पोहोचवण्यासाठी बाजीप्रभूंनी जीवाची बाजी लावली होती.
विशाळगडावर साहसी ट्रेकिंगचा अनुभव घेता येतो. येथे पावसाळ्यात जाणे टाळा. तुम्ही उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात येथे आवर्जून जाऊ शकता. हिवाळ्यात चढाई करणे सोपे आहे.
विशाळगड हा ऐतिहासिक किल्ला साधारणपणे अकराव्या-बाराव्या शतकात शिलाहार घराण्यातील राजा भोज दुसरा याने बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये आदिलशाहीकडून जिंकून घेतला.
विशाळगडाजवळ आंबा घाट, पावनखिंड , अमृतेश्वर मंदिर , पाळेश्वर धबधबा, पन्हाळा किल्ला ही पर्यटन स्थळे आहेत.
तुम्ही छत्रपती शाहू महाराज टर्मिनसला उतरून पुढे रिक्षा किंवा बसने विशाळगडाच्या पायथ्याशी पोहचाल.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.