Siddhi Hande
रोहित शर्मानंतर किंग विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे. आता विराट कोहली फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसेल.
विराट कोहलीला भारताचा सर्वात्तम कसोटी कर्णधार म्हटले जाते. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने कसोटी क्रिकेटवर दशकभर राज्य केले होते.
विराट कोहलीने फलंदाजी अन् आपल्या आक्रमक स्वभावाने कसोटी क्रिकेटवर एकहाती वर्चस्व मिळावले होते.
सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर विराट कोहलीने चौथ्या क्रमांकावर खोऱ्याने धावा जमवल्या आहे.
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केल्यामुळे बीसीसीआय आणि भारतीय चाहत्यामध्ये नाराजी आहे.
विराट कोहलीची चौथ्या क्रमांकाची जागा कोणता खेळाडू घेणार? याची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे.
विराट कोहली निवृत्त झाल्यामुळे मुंबईकर श्रेयस अय्यर याला पसंती मिळू शकते.
गेल्या काही दिवसांपासून कसोटी क्रिकेटपासून दूर असलेल्या श्रेयस अय्यरची टीम इंडियात वाइल्ड कार्ड एन्ट्री होऊ शकते.
श्रेयस अय्यरचा सध्याचा फॉर्म आणि अनुभव पाहाता बीसीसीआयकडून विराट कोहलीच्या जागी अय्यरला संधी देऊ शकते.
श्रेयस अय्यरने आतापर्यंत १६ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
आतापर्यंत श्रेयसला कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी हवी तशी मिळाली नाही.पण विराटने निवृत्ती घेतल्यानंतर श्रेयसला टीम इंडियात स्थान मिळू शकते. विराट कोहलीप्रमाणेच श्रेयस अय्यर याची फलंदाजी संयमी आणि आक्रमक आहे, त्यामुळे अय्यरच्या नावाचा विचार केला जाईल.
Next: वडील झाल्यानंतर पुरूषांमध्ये होतात 'हे' ५ बदल, जे कोणालाही दिसत नाही