Sakshi Sunil Jadhav
विंचू हा अत्यंत धोकादायक आणि डोंगराळ भागात किंवा खेड्यात आढळणारा एक विषारी कीटक आहे.
जेव्हा विंचू चावतो तेव्हा त्यांचं विष संपूर्ण शरीरात पसरु शकतं. त्यामुळे त्यावर वेळेवर उपचार करणं महत्वाचं असतं.
बऱ्याच जणांना विंचू चावल्यावर काय करावं हे कळत नाही. पुढील माहितीत आपण यावर घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
जर तुमच्याही परिसरात वाढत्या उन्हामुळे बिळातून विंचू बाहेर पडत असतील तर तुम्ही सगळ्यात आधी एका जागी स्थिर थांबा कमी हालचाल करा.
महत्वाचं म्हणजे विंचवाने ज्या ठिकाणी दंश मारलाय, तिथे थोड्या वरच्या अंतरावर तुम्ही एका कपड्याने बांधून ठेवा.
तुम्ही जितकं हलता तितकं विंचवाचं विष तुमच्या शरीरात पसरत जातं.
पुढे विंचू ज्या ठिकाणी चावला तिथे कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्याने इतर संसर्ग होत नाहीत.
आयुर्वेदिक उपाय म्हणजे तुळशीच्या पानांचा रस काढून विंचू ज्या ठिकाणी चावलाय तिथे लावा. त्याने विषारी गुणधर्म कमी होतात.
तुम्ही हा तात्पुरता उपाय करु शकता. मात्र तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊन त्यावर उपचार करणं अनिवार्य आहे.