Shreya Maskar
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला वसेला आहे. हा किल्ला वाघोटन नदीच्या (खाडीच्या) मुखाशी असून त्याच्या तीन बाजूंना अरबी समुद्र आहे.
विजयदुर्ग किल्ला मूळतः शिलाहार वंशाच्या राजा भोज (दुसरा) याने ११९३ ते १२०५ या काळात बांधला होता. नंतर १६५३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि पुनर्बांधणी केली.
विजयदुर्ग किल्ल्याचे जुने नाव 'घेरिया' होते. शिवाजी महाराजांनी ते बदलून 'विजयदुर्ग' असे ठेवले. विजयदुर्ग किल्ला हा सागरी स्थापत्य-अद्भूत नमुना आहे, जो 'पूर्वेकडील जिब्राल्टर' म्हणून ओळखला जातो.
विजयदुर्ग किल्ल्याच्या पाण्याखालील १२० मीटर लांबीची एक गुप्त भिंत आहे जिच्यामुळे शत्रूची जहाजे फुटून बुडत असत. इतिहासात या किल्ल्याला मोठे महत्त्व आहे. ओहोटीच्या वेळीही ती पाण्याखालीच राहते.
४० किमी लांबीच्या उथळ वाघोटन-खारेपाटन खाडीत मोठी जहाजे प्रवेश करू शकत नसत, परंतु मराठ्यांची युद्धनौका उघड्या समुद्रातून कोणालाही न दिसता आत येऊन नांगर टाकू शकत असत.
२०० मीटर लांबीचा एक भूमिगत बोगदा किल्ल्याच्या आतील भागाला जमिनीवरील जवळच्याच एका राजवाड्याशी जोडतो, जेणेकरून आणीबाणीच्या वेळी सुरक्षित बाहेर पडता येईल.
किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ हनुमानाचे एक अनोखे मंदिर आहे. किल्ल्यामध्ये 'खलबतखाना' आहे, जिची रचना लष्करी नियोजनासाठी गुप्त आणि ध्वनी-रोधक केली गेली होती.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.