Shruti Vilas Kadam
हिंदू धर्म आणि वास्तूशास्त्रानुसार 'कासव' हे पवित्र मानले जाते. विष्णूचा 'कूर्मावतार'असल्यामुळे मंदिरात गाभाऱ्याबाहेर कासवाची मूर्ती ठेवतात.
कासव संयम,स्थिरता,एकाग्रता आणि भक्तीचे प्रतीक आहे
असे मानले जाते की,ज्या घरात धातूंचे कासव असते तिथे कायम समृद्धी असते.
धातूचा कासव दुकानात किंवा ऑफिसमध्ये ठेवल्यास धनधान्याचा तुटवडा भासत नाही.
संयम, स्थिरता,एकाग्रता ही प्रतिके कासवाची असतात त्यामुळे घरातील ताणतणाव कमी होऊन शांतता आणि स्थिरता नांदते.
घरात प्रवेशदारजवळ कासव ठेवल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
धातूच्या कासवाला काचेच्या किंवा तांब्याच्या भांड्यात पाण्यात ठेवल्यास शुभ प्रभाव आणखी वाढतो.
धातूच्या कासवाचे मुख उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे, ज्यामुळे नोकरी आणि व्यवसायात प्रगती होते.
ॐ आं ह्रीं क्रौं कूर्माय नमः या मंत्राचा जप केल्याने विष्णूदेव संकटांपासून रक्षण करतात, अशी मान्यता आहे.