Shreya Maskar
उत्तन बीच हे मुंबईजवळील एक शांत, स्वच्छ आणि कमी गर्दीचे समुद्रकिनाऱ्याचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. वसई-विरारच्या लोकांसाठी वीकेंडला फिरायला हे बेस्ट लोकेशन आहे.
उत्तन बीच हा मीरा-भाईंदर भागात वसलेला आहे. संध्याकाळी निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही येथे मनसोक्त वेळ घालवू शकता. तुम्ही येथे फोटोशूटचा भन्नाट आनंद घ्या.
उत्तन बीचचा परिसर येथील स्थानिक कोळी संस्कृती, ताजे सी-फूड, टेकडीवरून दिसणारी सुंदर दृश्ये यांसाठी ओळखले जाते.
मुंबईतील मुख्य शहरांमधील समुद्रकिनाऱ्यांच्या तुलनेत येथे खूपच कमी गर्दी असते आणि परिसर अधिक स्वच्छ असतो.
उत्तन बीचला आल्यावर आवर्जून येथील सी-फूडचा आनंद घ्या. तसेच समुद्रकिनाऱ्याच्या आजूबाजूला खाण्यापिण्यासाठी हॉटेल आणि रेस्टॉरंट्स आहेत.
पावसाळ्यात येथे थंड वाऱ्याचा स्पर्श होते. थंड पाण्यातून चालताना संध्याकाळी खूपच भारी वाटते. लहान मुलांना हे ठिकाण खूपच आवडेल.
उत्तन बीचला जाण्यासाठी विरार ट्रेन पकडून भाईंदर स्टेशनला उतरा. पुढे स्टेशनपासून उत्तन बीचपर्यंत रिक्षाने प्रवास करा.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.