Shreya Maskar
मुंबईच्या अगदी जवळ वसई किल्ला लपलेला आहे. वसई किल्ल्याला 'बसीन किल्ला' म्हणूनही ओळखले जाते.
वसई किल्ला पालघर जिल्ह्यातील वसई येथील 'पाचू बंदर' भागात, मुंबईपासून उत्तरेस सुमारे ५० किलोमीटर अंतरावर वसलेला आहे.
वसई किल्ला समुद्रकिनाऱ्यावर वसलेला असून, येथून उल्हास नदी अरबी समुद्राला जिथे मिळते, तो संगम परिसर दिसतो. वसई किल्ला हा १६ व्या शतकातील पोर्तुगीजकालीन ऐतिहासिक किल्ला आहे.
वसई किल्ल्याची उभारणी पोर्तुगीजांनी केली. त्यांनी १५३६ मध्ये हा किल्ला बांधला. गुजरातचा सुलतान बहादूर शाह याने १५३३ मध्ये बांधलेल्या एका लहान किल्ल्याच्या जागी त्यांनी हा नवीन आणि मोठा किल्ला उभारला.
वसई किल्ल्याचा आकार साधारणपणे दशकोनी आहे. हा एक अनियमित बहुभुज आकाराचा किल्ला असून तो सुमारे ११० एकर परिसरात पसरलेला आहे.
जाड दगडी भिंती, १०-११ बुरुज आहेत. किल्ल्याला भेट दिल्यावर युरोपियन शैली पाहायला मिळते.हा किल्ला शक्तिशाली तोफांच्या माऱ्यापासून वस्तीचे संरक्षण करण्यास सक्षम होता.
वसई किल्ला मराठा सेनापती चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली १७३९ मध्ये झालेली ऐतिहासिक 'वसईची लढाई' यासाठी ओळखला जातो.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.