ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतासाठी, राष्ट्रगीत जन गण मन आणि राष्ट्रीयगीत वंदे मातरम् हे अभिमानाचे प्रतीक आहेत.
हे दोन्ही गीत देशभक्ती, एकता आणि राष्ट्रीय भावना जनमानसात जागृक करतात.
तसेच, दोघांचाही राष्ट्राप्रती आदर आणि समर्पण व्यक्त करणे हा एकच उद्देश आहे.
जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत आहे.
जन गण मन हे राष्ट्रगीत रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे.
जन गण मन हे गाणे पहिल्यांदा २७ डिसेंबर १९११ रोजी कोलकाता येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात गायले गेले.
राष्ट्रीय सण, सरकारी कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीत गायले जाते.
वंदे मातरम् हे भारताचे राष्ट्रीयगीत आहे.
वंदे मातरम् या राष्ट्रीयगीताला ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्ष पूर्ण झाली आहेत.
वंदे मातरम् हे बकिंमचंद्र चाट्टोपाध्याय यांनी लिहले आहे.
संविधानात वंदे मातरम् ला राष्ट्रगीतासारखाच दर्जा आहे, परंतु ते गाणे सक्तीचे नाही.