Shreya Maskar
ठाणे जिल्ह्याला तलावांचे सौंदर्य लाभले आहे. शहरातील गर्दीपासून उपवन तलावाला भेट देऊन शांतीचा विसावा घ्या.
उपवन तलावाचे खरे सौंदर्य सायंकाळी पाहायला मिळते. थंडगार वातावरण आणि पाण्याच्या लहरींचा मंद आवाज जीवाला सुखावतो.
ठाण्यातील उपवन तलावला ऐतिहासिक ओळख आहे. तसेच हे पर्यावरणपूरक तलाव आहे.
उपवन तलावाच्या परिसरात अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम होतात. त्यामुळे हे पर्यटकांचे आकर्षण आहे.
उपवन तलाव फोटोशूटसाठी उत्तम ठिकाण आहे. या परिसरातील हिरवळ तुमच्या फोटोंचे सौंदर्य आणखी वाढवेल.
सायंकाळी कारंज्याचे अद्भुत सौंदर्य पाहत तुम्ही बोटिंगचा देखील आनंद लुटू शकता.
गजबजलेल्या शहरामध्ये स्वतःसोबत वेळ घालवण्यासाठी हे एक शांत ठिकाण आहे. निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही स्वतःला जवळून ओळखू शकता.
तुम्ही कधीही उपवन तलावला भेट देऊ शकता. पण पावसात याचे सौंदर्य आणखी वाढते. त्यामुळे पावसात आवर्जून उपवन तलावाला भेट द्या.
मध्ये रेल्वे मार्गावरून ठाणे स्टेशनला उतरावे. त्यानंतर पश्चिमेकडून उपवन तलावाला जायला तुम्हाला अनेक रिक्षा मिळतील.