Sakshi Sunil Jadhav
सध्या देशभरात होत असलेल्या सायबर फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बँका आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) यांनी UPI व्यवहार सुरक्षित व्हावे यासाठी प्रयत्न करत आहे.
ग्राहकांच्या खात्यांचे संरक्षण करण्यासाठी ऑटोमेटेड रिस्क मॉनिटरिंग सिस्टम आता जास्त सक्रीय होऊन काम करतंय. त्यामुळे कोणतेही चुकीचे व्यवहार आढळल्यास कारवाई होऊ शकते.
खात्यातल्या व्यवहारांमध्ये जर काही चुकीची हालचाल दिसली तर बँका UPI पेमेंट तात्पुरता ब्लॉक करू शकते.
रोज छोटी रक्कम ट्रान्सफर करणारे अचानक मोठी रक्कम पाठवत असेल तर सुरक्षा प्रणाली सतर्क होईल.
जेव्हा बॅंकेला तुमच्या ट्रान्सफरवर संशय येईल तेव्हा UPI वरील मर्यादा तात्पुरती थांबवली जाऊ शकते.
तुम्ही जर एकाच दिवशी वेगवेगळ्या शहरांमधून किंवा लांबच्या लोकेशनवरून ट्रान्सफर करत असाल तर रिस्क मॉनिटरिंग सिस्टम अलर्ट होऊ शकतं.
तुम्ही जर वारंवार चुकीचा युपीआय पीन टाकत असाल तर तात्पुरता निर्बंध लागू शकतो.
बॅंका या २४ तास तुमचं खातं पॉझ करतात. त्या कालावधीत तुमचे व्यवहार थांबतात. गरज असेल तर तुम्ही बॅंकेशी संपर्क साधून सेवा पुन्हा सुरु करू शकता.