Shreya Maskar
भारतात अशी अनेक गावे आहेत, जी आपल्या खास वैशिष्ट्यांसाठी ओळखली जातात. एक असेच गाव आहे. जिथे लोक एकमेकांची नाव न घेता, एकमेकांना एका खास प्रकारच्या शिट्टी आवाजाने बोलवतात.
भारताचे व्हिस्लिंग गाव, कोंगथॉन्ग, मेघालयच्या पूर्व खासी हिल्स जिल्ह्यात, राज्याची राजधानी, शिलाँगपासून अंदाजे 60 किलोमीटर (सुमारे 37 मैल) अंतरावर आहे.
काँगथोंग गाव मेघालयच्या पूर्व खासी हिल्स जिल्ह्यात शिलाँगपासून अंदाजे 60 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.
काँगथोंग गाव हे भारताचे व्हिस्लिंग गाव ('भारताचे शिट्टी वाजवणारे गाव') म्हणून ओळखले जाते. आयुष्यात एकदा तरी या गावाला नक्की भेट द्या.
काँगथोंग गावाचे वैशिष्ट्य म्हणजे तिथली एक विलक्षण परंपरा, जिथे प्रत्येक रहिवाशाला त्याच्या नावाऐवजी एक अद्वितीय संगीत धून (शिट्टीच्या सुरांवरून ) दिली जाते.
असे बोले जाते की, प्रत्येक रहिवाशाला एका अद्वितीय सुरावरून ओळखले जाते. जो त्यांच्या आईने रचलेला असतो आणि अंगाईगीताच्या रूपात पिढ्यानपिढ्या चालत आलेला असतो.
स्थानिक पातळीवर 'जिंगरवाई इओबेई' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रथेचा अर्थ 'मूळ पूर्वज स्त्रीची गाणी' असा होतो, जी कुळाच्या पहिल्या आईचा सन्मान करते.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.