Shruti Vilas Kadam
तुळस, आले, दालचिनी, काळी मिरी आणि लवंग यांसारख्या घटकांमुळे उकाळा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करू शकतो.
पावसाळ्यात होणारा सर्दी, खोकला आणि घसा खवखवण्याचा त्रास कमी करण्यासाठी गरम उकाळा उपयुक्त ठरू शकतो.
आले, जिरे आणि इतर मसाल्यांमुळे पचन सुधारण्यास मदत होते. अपचन, गॅस आणि पोट फुगण्याचा त्रास कमी होऊ शकतो.
थंड आणि दमट वातावरणात उकाळा शरीर उबदार ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे थंडी वाजणे किंवा अंगदुखीचा त्रास कमी होऊ शकतो.
गरम उकाळ्यामुळे घशातील जळजळ कमी होण्यास मदत होते. तसेच कफ सैल होऊन श्वास घेण्यासही आराम मिळू शकतो.
पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ घेतल्याने शरीर हायड्रेट राहते. उकाळ्यातील काही औषधी वनस्पती शरीराच्या नैसर्गिक डिटॉक्स प्रक्रियेला सहाय्य करू शकतात.
उकाळा आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी त्याचे अतिसेवन टाळावे. दिवसातून १ ते २ कप पुरेसे मानले जातात. गर्भवती महिला किंवा औषधे घेत असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच नियमित सेवन करावे.