Dhanshri Shintre
कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशीला तुळशी विवाह उत्साहात पार पडतो. हिंदू धर्मात हा सोहळा अत्यंत भक्तिभावाने साजरा होतो.
या वर्षी तुळशी-शालिग्रामचा पवित्र विवाह 2 नोव्हेंबरला होणार आहे. भक्त या दिवशी विशेष पूजा आणि विधी करणार आहेत.
कार्तिक द्वादशीच्या दुसऱ्या दिवशी तुळशी विवाह साजरा होतो. त्यामुळे हा दिवस देवुठाणी एकादशीनंतरचा विशेष धार्मिक सोहळा मानला जातो.
तुळशी विवाहाच्या दिवशी विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी अनेक पारंपरिक उपाय केले जातात. त्यापैकी हळदीचा एक खास विधी अत्यंत शुभ मानला जातो.
असे मानले जाते की तुळशी विवाहाच्या दिवशी हळदीचे विशेष उपाय केल्यास विवाहातील अडथळे दूर होऊन शुभ फळांची प्राप्ती होते.
तुळशी विवाहाच्या दिवशी सकाळी अंघोळीच्या पाण्यात थोडी हळद मिसळल्यास शुभत्व आणि सौभाग्य लाभते असे मानले जाते.
तुळशी विवाहाच्या दिवशी सकाळी अंघोळीच्या पाण्यात थोडी हळद मिसळल्यास शुभत्व आणि सौभाग्य लाभते असे मानले जाते.
स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा आणि नंतर तुळस व शालिग्रामची भक्तीभावाने पूजा करून शुभ आशीर्वाद मिळवा.
पूजेदरम्यान हळद किंवा दूध मिसळलेली हळद अर्पण करा. यामुळे गुरु ग्रह बलवान होऊन विवाहाचे शुभ योग निर्माण होतात असे मानले जाते.