Manasvi Choudhary
हिंदू शास्त्र पद्धतीनुसार दिवाळीनंतर तुळशी विवाह साजरा केला जाते.
तुळशीला माता लक्ष्मीसमान मानले जाते यामुळे तिची पूजा केली जाते.
कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला तुळशी विवाह साजरा केली जाते.
तुळशीविवाह म्हणजे तुळशीचे रोप (वृंदा) आणि भगवान विष्णूचे शालिग्राम रूप यांचा विवाह लावण्याची परंपरा आहे.
अख्यायिकेनुसार, जालंधर नावाच्या पराक्रमी राक्षसाची पत्नी वृंदा ही पतिव्रता होती. तिच्या पतिव्रतामुळे जालंधरला कोणीही हरवू शकत नव्हते.
यावेळी सर्व देवांनी विष्णूंची मदत घेतली आणि विष्णूंनी जालंधरचे रूप घेऊन वृंदेचे पातिव्रत्य भंग केले ज्यामुळे जालंधरचा वध झाला.
दरम्यान वृंदेने देहत्याग केला तेव्हा भगवान विष्णूंनी तिला तुळशीचे रोप होण्याचा वर दिला आणि स्वत: शालिग्राम रूपात तिच्याशी विवाह केला. म्हणून दिवाळीनंतर सर्वत्र तुळशीविवाह साजरा करण्याची प्रथा आहे.