Dhanshri Shintre
पावसाळ्यात आजार फक्त मुलांनाच नाही, तर प्रौढांनाही सर्दी, खोकला आणि ताप यांचा त्रास होतो.
म्हणून आज आम्ही पावसाळ्यात खाण्यासाठी अशा पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे तुमचे आरोग्य टिकवतील.
मसूर भाताबरोबर किंवा खिचडीमध्ये वापरल्यास आरोग्यास लाभदायक ठरते आणि स्वादही वाढवते.
डाळ खाण्याआधी फक्त ताजं आणि घरचं चिरलेलं सॅलड खा, शिळ्या सॅलडपासून दूर राहा.
रात्री झोपण्यापूर्वी फक्त तुम्हीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाने हळदीचं दूध नियमित पिणं लाभदायक आहे.
कोणताही चहा घेताना त्यात आले आणि तुळस घालून पावसाळ्यात प्यायल्यास आरोग्याला फायदा होतो.
पावसाळ्यात हिरव्या भाज्या येतात, मात्र त्यांना नीट स्वच्छ करून शिजवूनच सेवन करावं, म्हणजे आरोग्य सुरक्षित राहील.
पावसाळ्यात सकाळी कोमट पाणी प्यायल्यास घसा स्वच्छ राहतो आणि संसर्गापासून संरक्षण मिळते.
जर चहा नको असेल तर पावसाळ्यात दिवसातून एकदा काढा बनवून प्यायल्यास आरोग्य सुधारते.