Shreya Maskar
पावसाळ्यात तुम्ही ट्रेकिंगचा प्लान करत असाल तर मुंबईजवळ चढायला सोपे काही किल्ले आहेत. येथे तुम्ही ट्रेकिंग आणि पावसाचा आनंद घेऊ शकता.
कर्नाळा किल्ला हा पनवेलमध्ये वसलेला आहे. मुंबईजवळील हे महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे. कर्नाळा किल्ला हा कर्नाळा पक्षी अभयारण्यात आहे. येथे जवळपास २ तासांचा जंगल ट्रेक करून जावा लागतो.
लोणावळा येथे विसापूर किल्ला वसलेला आहे. विसापूरजवळ ट्रेकिंगसाठी कठीण असलेला लोहगड किल्ला आहे. तुम्ही वीकेंडला विसापूर किल्ल्याला भेट देऊ शकता.
खंडाळा येथे राजमाची किल्ला आहे. राजमाची किल्ल्याला जाण्यासाठी कोंदिवडे गावामधून वाट आहे. येथून सह्याद्रीच्या हिरव्यागार पर्वतरांगांचे विहंगम दृश्य दिसते.
कोरीगड किल्ला विरारपासून १५० किमी अंतरावर वसलेला आहे. किल्ल्यावरील पठार विस्तीर्ण आहे. पावसाळ्यात येथे ट्रेकिंग सुरक्षित मानले जाते.
पालघर येथे आशेरीगड किल्ला वसलेला आहे. जंगलातून जाणारा हा मध्यम स्वरूपाचा ट्रेक एका विशाल आणि ऐतिहासिक पठारावर संपतो.
कर्जत येथे सोंडाई किल्ला आहे. याचा पायथा मोरबे धरणाजवळ आहे. हा १- २ तासांचा ट्रेक आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.