Shreya Maskar
शिरगाव किल्ला हा जलदुर्ग आहे. इ.स. १२२५ मध्ये यादव काळात बांधला गेला. नंतर गुजरात सुल्तान, बहामनी, पोर्तुगीज आणि मराठे यांच्या ताब्यात होता.
अर्नाळा किल्ला देखील एक जलदुर्ग आहे. इ.स. १५१६ मध्ये सुलतान महमूद बेगडा यांनी बांधला. मराठा व पोर्तुगीज इतिहासाशी संबंधित आहे. येथे भवानी देवी, महादेवाचे मंदिर आहे.
वसई किल्ला हा भव्य भुईकोट किल्ला आहे. इतिहासातील महत्त्वाचा 'वसई तह' येथे झाला.
अशेरीगड हा डोंगरी किल्ला आहे. शिलाहार काळात बांधला गेला, नंतर पोर्तुगीजांनी ताबा घेतला. अशेरीगड ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे.
टकमक हा डोंगरी किल्ला आहे. येथे ट्रेकिंगचा थरार अनुभवता येतो. पोर्तुगीजांकडून मराठ्यांनी १७३९ मध्ये जिंकला.
केळवे किल्ला १६व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधला होता. पालघर जिल्ह्यातील केळवे बीचजवळ हा किल्ला त्यांच्या सागरी व्यापाराचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाचा सागरी किल्ला होता.
कोहोज किल्ला हा डोंगरी किल्ला आहे. सुमारे ८०० वर्ष जुना हा किल्ला मराठा आणि ब्रिटिश काळात महत्त्वाचा टप्पा आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.