Shreya Maskar
मुरुड-जंजिरा किल्ला हा रायगड जिल्ह्यातील एक अभेद्य सागरी किल्ला आहे. येथे तुम्ही हिवाळ्यात नक्की भेट द्या.
मुरुड-जंजिरा किल्ला त्याच्या भक्कम तटबंदी, ५७२ तोफा आणि विशेषतः 'कलाल बांगडी' नावाच्या तोफेसाठी ओळखला जातो.
अलिबागजवळच्या चौल गावात एक प्राचीन आणि सुंदर श्री रामेश्वर मंदिर आहे, जे भगवान शंकराला समर्पित आहे. आजूबाजूच्या परिसरात नारळी-पोफळीच्या बागा पाहायला मिळतात.
रेवदंडा किल्ला पोर्तुगीजांनी बांधलेली मोठी तटबंदी, कुंडलिका नदी आणि समुद्राच्या संगमावर वसलेला आहे. येथून अरबी समुद्राचे विहंगम दृश्य दिसते.
खांदेरी-उंदेरी किल्ले हे मुंबईजवळ अरबी समुद्रात असलेले महत्त्वाचे जलदुर्ग आहेत, जे शिवाजी महाराजांनी सिद्दी आणि इंग्रजांना शह देण्यासाठी बांधले होते.
उंदेरीवर तोफांचे स्थान आणि खांदेरीवरील लाईटहाऊस (दीपगृह) आहे. हे ठिकाण इतिहासातील महत्त्वाचे आहे.
मुरुड बीच शांत वातावरण, स्वच्छ काळी वाळू, नारळाच्या झाडांची हिरवळ, जंजिरा किल्ल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि डॉल्फिन पाहण्याची संधी या सर्वांसाठी प्रसिद्ध आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.