Manasvi Choudhary
केळी आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक मानले जाते. केळी खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.
केळी खाल्ल्याने शरीराला उर्जा प्राप्त होते. संपूर्ण दिवसभर एनर्जी राहण्यासाठी तुम्ही आहारात केळी खाणे महत्वाचे आहे.
केळी खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो. केळ्यामध्ये पोटॅशिअम मोठ्या प्रमाणात असते जे शरीराचे रक्तदाब नियंत्रणात ठेवते.
केळे पचायला हलके असते यामुळे पोटाला कोणताही त्रास होत नाही बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
केळे खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेले वाटते, ज्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा होत नाही आणि वजन नियंत्रित राहते.
किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होतो आणि किडनीचे कार्य सुरळीत चालते.
केळ्यामध्ये नैसर्गिकरीत्या अँटासिड गुणधर्म असतात. जर तुम्हाला वारंवार छातीत जळजळ किंवा ॲसिडिटी होत असेल, तर केळी खाणे महत्वाचे आहे.
सकाळी नाश्त्याला किंवा दुपारी केळी खाणे सर्वात उत्तम. रात्री उशिरा केळी खाल्ल्याने कफ किंवा सर्दी होऊ शकते.