Shreya Maskar
भारतीय जेवणात भाताला विशेष महत्त्व आहे. डाळ-भात प्रत्येकांच्या घरी आवर्जून खाल्ला जातो. तसेच काही कार्यक्रम- समारंभांना बिर्याणी, पुलाव देखील बनवला जातो. भाताचे विविध प्रकार खायला चवदार लागतात.
लोक अनेकदा तक्रार करतात की, भात एकतर कमी शिजलेले राहतो किंवा खूप चिकट होतात. त्यामुळे रेसिपीची चव बदलते. मात्र आज आपण परफेक्ट भात कसा शिजवावा, जाणून घेऊयात.
परफेक्ट मोकळा भात बनवण्याचे सीक्रेट केवळ पाण्याच्या प्रमाणातच नाही तर तांदूळ धुणे, भिजवणे आणि शिजवणे यासर्वांच्या तापमानात देखील आहे.
मास्टर शेफ कुणाल कपूर यांनी सांगितलेल्या सिंपल ट्रिक वापरून तुम्ही मोकळा, फुललेला भात बनवू शकता. टिप्स आताच नोट करा.
तुम्ही तांदूळ प्रेशर कुकरमध्ये शिजवत असाल तर १ कप भातासाठी फक्त १ कप पाणी वापरा. जर भांड्यात तांदूळ शिजवत असाल तर १ कप भातासाठी २ कप पाणी वापरा.
शिजवण्यापूर्वी तांदूळ किमान २०-३० मिनिटे स्वच्छ पाण्यात भिजवा. नंतर एका भांड्यात पाणी उकळवा त्यात मीठ आणि थोडे तेल मिक्स करून त्यात तांदूळ शिजवा.
पॅनमध्ये पाणी उकळवा त्यात मीठ, तेल आणि तांदूळ घालून शिजवा. मात्र लक्षात घ्या, आधी भांड्यावर झाकण ठेवू नका, पाणी तांदळाच्या थरापर्यंत पोहोचेपर्यंत शिजवा. नंतर झाकण ठेवून १५ मिनिटे शिजवा.
तुम्हाला आवडत असेल तर, तांदूळ उकळत असताना लिंबाचा रस किंवा तूप घाला. लिंबू तांदूळ पांढरा आणि मऊ करेल आणि तूप तांदूळ मोकळा करले, तो चिकटणार नाही.