Surabhi Jayashree Jagdish
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय. देशाने आतापर्यंत अनेक दिग्गज नेते विमान अपघतात गमवले आहेत.
1965 च्या युद्धादरम्यान कच्छच्या रणात निरीक्षण करण्यासाठी गुजरातचे तेव्हाचे मुख्यमंत्री विमानातून प्रवास करत होते. त्यावेळी पाकिस्तानने त्यांचं विमान पाडलं. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. विमान अपघतात मृत्यू होणारे मेहता हे पहिले मोठे राजकीय नेते होते.
काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांमध्ये संजय गांधी यांचं नाव घेतलं जात होतं. त्यांना विमान उडवण्याची आवड होती. ते स्वतः एकदा विमान उडवत असताना त्यांचा मृत्यू झाला.
उत्तरप्रदेशमध्ये झालेल्या विमान अपघतात माधवराव शिंदे यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी शिंदे हे प्रचारासाठी कानपूरला जात होते.
डॉ. जी.एम.सी बालययोगी हे त्यावेळी लोकसभेचे त्यावेळचे अध्यक्ष होते. आंध्रप्रदेशात त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. या अपघातात त्यांचं निधन झालं.
सिप्रियान संगमा हे मेघालयचे ग्रामविकास मंत्री होते. ते गुवाहाटीहून शिलाँगला जाणाऱ्या पवनहंस कंपनीच्या हेलिकॉप्टरमध्ये बसले. हे हेलिकॉप्टर कोसळून त्यांचा मृत्यू झाला.
ओमप्रकाश जिंदाल हे उद्योदपती आणि हरियाणाचे मंत्री होते. एका हेलिकॉप्टरट्या अपघातात त्यांचं निधन झालं. तर याच अपघातात कृषिमंत्री सुरेंद्रसिंह यांचाही मृत्यू झाला.
आंध्रप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी यांनाही हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमवावा लागलाय. सकाळी ८ वाजत्याच्या सुमारास रेड्डी बेगमपेटहून चित्तूरला जात होते. यावेळी त्यांचं हेलिकॉप्टर रेडारवरून गायब झालं. यानंतर त्याचे अवशेष जंगलात सापडले.
अरूणाचल प्रदेशचे त्यावेळचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. खांडू हे तवांगहून इटानगरच्या दिशेने जात असताना त्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं.
सरसेनाध्यक्ष असलेल्या जनरल बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं. तामिळनाडूतील कुन्नुर जवळ हा अपघात झाला होता.
अहमदाबादून लंडनला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये विजय रूपानी बसले होते. एअर इंडियाच्या या विमानाचा अपघात झाला आणि २४२ हून अधिक प्रवाशांचा यामध्ये मृत्यू झाला. यामध्ये विजय रूपानी यांचाही समावेश होता.