Surabhi Jayashree Jagdish
हार्ट अटॅक तेव्हा होतो जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हृदयाच्या स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि नुकसान होऊ शकते. वेळेत उपचार न मिळाल्यास ही स्थिती जीवघेणी ठरू शकते.
छातीत दाब, जडपणा किंवा तीव्र वेदना हे हार्ट अटॅकचं प्रमुख लक्षण मानलं जातं. काही लोकांना श्वास घेण्यास त्रास, घाम येणं, मळमळ किंवा हात, मान आणि जबड्यात वेदना जाणवू शकतात. अशी लक्षणं दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेणं अत्यंत आवश्यक आहे.
जेवणानंतर 10 ते 12 मिनिटं चालल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. नियमित चालल्यामुळे ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाणही कमी होण्यास मदत होते आणि हृदय अधिक निरोगी राहते.
सॅल्मन, मॅकरेल आणि सार्डिनसारख्या तेलकट माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असतं. हे घटक रक्तवाहिन्यांतील सूज कमी करण्यास आणि हृदयाचे कार्य सुधारण्यास मदत करतात.
दररोज 7 ते 8 तासांची शांत आणि नियमित झोप हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. खूप कमी किंवा खूप जास्त झोप घेतल्यास हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो. चांगली झोप रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास आणि शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते.
काही प्लास्टिक उत्पादनांमध्ये आढळणारे BPA आणि फ्थॅलेट्ससारखे केमिकल्स हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात. या रसायनांमुळे शरीरात सूज, ऑक्सिडेटिव्ह ताण आणि हार्मोन्सचे असंतुलन निर्माण होऊ शकते.
लिपिड प्रोफाइल, ट्रायग्लिसराइड्स आणि इतर रक्त तपासण्यांमुळे हार्ट अटॅकचा धोका लवकर ओळखता येतो. कोलेस्ट्रॉल पातळी वाढलेली असल्यास डॉक्टर योग्य वेळी उपचार सांगू शकतात.