Manasvi Choudhary
नाशिक हे शहर प्रसिद्ध ठिकाण आहे. नाशिक शहराला जुना ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे म्हणूनच विविध ठिकाणाहून पर्यटक नाशिक शहराला भेट देतात.
नाशिक हे गोदावरी कुशीत वसलेलं एक तिर्थक्षेत्र आहे. नाशिकमधील गोदावरीचा घाट, त्र्यंबकेश्वर, पंचवटी ही प्रसिद्ध ठिकाणे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते.
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. त्र्यंबकश्वेर हे नाशिकमधील ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेलं ठिकाण आहे.
अख्यायिकेनुसार, नाशिकमध्ये राम, सीता आणि लक्ष्मण यांनी वनवास केला होता.
रामाच्या वनवासादरम्यान लक्ष्मण आणि शूर्पणखा यांच्यात वाद झाला होता. यावेळी लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखेचे नाक कापले होते म्हणून शहराला नाशिक असे नाव पडले.