ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल अनेक लोक डायबिटीजच्या समस्येने त्रस्त आहेत.
फक्त साखर खाल्ल्यानेच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही. तर काही भाज्यांचे सेवन केल्याने देखील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.
पण डायबिटीजची समस्या असल्यास कोणत्या भाज्या खाऊ नयेत हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या.
डायबिटीजच्या रुग्णांनी बटाटे खाऊ नयेत यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.
जर तुम्हाला मधुमेहाची समस्या असेल तर रताळ्याचे सेवन करु नका.
मधुमेही रुग्णांनी स्वीट कॉर्न खाऊ नये कारण यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.
मधुमेही रुग्णांनी सुरण खाणं टाळावे. अन्यथा ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते.