Dhanshri Shintre
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात प्राचीन इतिहास असणाऱ्या आळसंद या गावामध्ये १-२ नाही तर तब्बल १३० मंदिरं याहेत.
ही मंदिरे वेगवेगळ्या देवी-देवतांचे आणि प्राचीन मंदिरं आहेत.
यामुळे हे गाव 'मंदिरांचे गाव' म्हणून ओळखले जाते.
आळसंद गावाची लोकसंख्या साधारण ९ हजार असून या गावात प्राचीन इतिहास पाहायला मिळतो.
विशेष म्हणजे या गावामध्ये हेमाडपंथीय मंदिरांचे देखील समावेश आहे.
या गावामध्ये एका ठिकाणी सरस्वती देवीची मूर्ती शिळेवर कोरण्यात आली आहे जी खूप दूर्मिळ आहे.
इथे काशी विषवेश्वेर मंदिर आहे जे हेमाडपंथी मंदिर असून जवळपास ३५० वर्ष जुनं आहे. इथले दगडी खांब अतिशय नक्षीदार आहेत.
इथे शिव पार्वतीचं पंचमुखी शिवालय आहे. तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर, गणपती मंदिर, मायक्का मंदिर, नागदेवता मंदिर, लक्ष्मी मंदिर, दत्त मंदिर असे जुन्या काळातील मंदिर आहेत.
या गावात गुमानगिरी, लालगिरी आणि मनशागिरी महाराज अशा ३ महाराजांनी जिवंत समाधी घेतल्या आहेत.