GK: भारताचे एकमेव गाव जिथे घरांना दरवाजे नाहीत, तरीही चोरी होत नाही

Dhanshri Shintre

कुलूप लावण्याची गरज

भारताची एक खास जागा अशी आहे जिथे घर, दुकान, बँक कुठेही कुलूप लावण्याची गरज भासत नाही.

जाणून घ्या

चला जाणून घेऊया अशा गावाबद्दल जिथे लोक दरवाजे न लावता निर्धास्तपणे आयुष्य जगतात.

शनी शिंगणापूर

महाराष्ट्रातील शनी शिंगणापूर हे गाव प्रसिद्ध आहे कारण येथे घरांना दरवाजेच नसतात, तरीही चोरी होत नाही.

चोरी करण्याची हिंमत

मान्यता आहे की शनिदेव स्वतः गावाचे रक्षण करतात, त्यामुळे चोरही चोरी करण्याची हिंमत करत नाहीत.

सुरक्षा आणि शांती

आजही या गावातील घरे, दुकाने आणि बँका दरवाजेविना असूनही तेथे सुरक्षा आणि शांती अबाधित आहे.

काळा दगड

मुसळधार पावसानंतर सापडलेल्या काळ्या दगडामुळे गावप्रमुखाला स्वप्नात दर्शन देत शनिदेवांनी मंदिर बांधण्याचा आदेश दिला.

शनिदेव

मान्यता आहे की शनिदेवांनी सांगितले होते, मी गावाचे स्वतः रक्षण करीन, मला मंदिरासाठी भिंती नकोत.

चोरीची घटना नाही

त्यादिवसापासून आजपर्यंत या गावात एकाही चोरीची घटना घडलेली नाही, हे खरोखरच अद्भुत आहे.

NEXT: मुंग्या एकाच रांगेत का चालतात? जाणून घ्या त्यामागील रंजक कारण

येथे क्लिक करा