Dhanshri Shintre
जरी प्रत्येक देशाचे स्वतःचे कामगार कायदे असले, तरी भारतासह अनेक ठिकाणी लोकांना अजूनही दररोज १२ तास काम करावे लागते.
सरकार कर्मचाऱ्यांचे हक्क आणि कामाचे तास ठरवण्यासाठी खासगी कंपन्यांवर लक्ष ठेवते.
पण एक देश असा आहे जिथे सरकारच नागरिकांची धावपळ कमी करते.
अहवालानुसार, या देशात आठवड्यात जास्तीत जास्त ४० तास काम करण्याची परवानगी आहे, पण बहुतांश लोक यापेक्षाही कमी काम करतात.
याच कारणामुळे २०२२ मध्ये या देशाला जगातील सर्वात कमी सरासरी कामाचे तास असलेला देश म्हणून ओळख मिळाली.
प्रशांत महासागरातील ३३ बेटांचा देश किरिबाटी, ज्याची राजधानी तारावा आहे, यातील फक्त २० बेटांवरच लोकवस्ती असून तो पूर्वी फारसा परिचित नव्हता.