ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सकाळी उठल्यावर किंवा बाहेरुन घरी आल्यावर लोक दिवसातून असे ३-४ वेळा अंघोळ करतात.
तापात अंघोळ केल्यास शरीरावर काय परिणाम होतो, जाणून घ्या.
ताप असताना तुम्ही अंघोळ करू शकता. परंतु ताप असताना कोमट पाण्यानेच अंघोळ करा. पाणी कोमट असावे याची विशेष काळजी घ्या.
ताप आल्यास, कोमट पाणी शरीराचे तापमान कमी करते आणि शरीराच्या वेदनांपासून आराम देते. अंघोळ केल्याने तुम्हाला ताजेतवाने आणि चांगले वाटते.
ताप असताना आंघोळ केल्याने तुमच्या स्नायूंना आराम मिळतो. परंतु, जर ताप जास्त असेल तर आंघोळ करणे टाळावे. यामुळे शरीराचे तापमान वाढू शकते.
जर तुम्हाला जास्त ताप असताना देखील अंघोळ करायची असेल, तर यासाठी तुम्ही एक ओला टॉवेल घ्यावा आणि या ओल्या टॉवेलने तुमचे शरीर स्वच्छ करावे.
ताप कमी करण्यासाठी तुम्ही तुळशीचे सेवन करू शकता. त्यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-बायोटिक गुणधर्म आहेत. यामुळे खूप आराम मिळेल.