ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पालघर जिल्ह्यातील वसईजवळील सुरुची बीच हे निसर्गरम्य आणि शांत समुद्रकिनार्यांपैकी एक आहे. गर्दीपासून दूर, रिलॅक्स होण्यासाठी हा समुद्रकिनारा बेस्ट आहे.
स्वच्छ वाळू, लाटांचा शांत आवाज आणि लांबलचक किनाऱ्यामुळे सुरुची बीच खूप सुंदर दिसतो. सकाळी आणि संध्याकाळी इथले दृश्य खास बघण्यासारखे असते.
वसई रोड स्टेशनवर उतरून ऑटो किंवा बसने सुरुची बीचला जाता येते. मुंबईहून जायचे असेल तर कारने किंवा ट्रेनने तुम्ही सहज जावू शकता.
सुरुची बीचवरील सनसेटची दृश्ये अत्यंत सुंदर असतात. सनसेट पाहण्यासाठी संध्याकाळच्या वेळीस पर्यटक गर्दी करतात.
निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफीसाठी हा बीच परफेक्ट आहे. संध्याकाळच्या वेळीस येथे बेस्ट फोटोशूट तुम्ही करु शकता. सुरुची बीचवर प्रीवेडिंग शूट सुध्दा करता येते. तसेच फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत सुंदर फोटोज् काढू शकता.
गर्दी कमी असल्यामुळे शांततेत बसू शकता. स्व:ताचा मी टाइम समुद्राकडे बघून स्पेंड करु शकता.
फॅमिली पिकनिकसाठी सुरुची बीच ही जागा एकदम योग्य आहे. मुलांसाठी मोकळी जागा आणि मोठ्यांसाठी शांत वातावरण येथे आहे.
इथे जास्त फूड स्टॉल्स नसल्यामुळे, घरातून सोबत खाण्यासाठी घेवून जा. पाणी, स्नॅक्स आणि कचरा टाकण्यासाठी पिशवी सोबत न्या.