ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणे महत्वाचे आहे.
कडक उन्हापासून आराम मिळवण्यासाठी, लोक ऊसाचा रस आणि नारळ पाणी पिणे पसंत करतात
ऊसाचा रस की नारळ पाणी, आरोग्यासाठी कोणते जास्त फायदेशीर आहे ते जाणून घ्या.
ऊसाच्या रसामध्ये नैसर्गिक साखर मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.
कडाक्याच्या उन्हात एक ग्लास उसाचा रस तुम्हाला रिचार्ज करु शकतो. ऊसाचा रस पचनसंस्थेसाठी तसेच त्वचेसाठी फायदेशीर आहे.
नारळ पाणी हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. त्यात इलेक्ट्रोलाइट्स असतात जे शरीराला हायड्रेट ठेवतात. तसेच यामध्ये पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियम असते.
जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर ताजेतवाने होण्यासाठी ऊसाचा रस पिऊ शकता. परंतु जर तुम्हाला तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवायचे नारळ पाणी बेस्ट आहे.