Shreya Maskar
मोड आलेले कडधान्यांमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असतात. यामुळे पचनशक्ती सुधारते. तसेच थंडीत यांचे आवर्जून सेवन करा.
मोड आलेले कडधान्य कच्चे खाल्ल्यामुळे मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजार दूर राहतात. तसेच शरीराला ऊर्जा मिळते.
उकडलेले कडधान्य कोणत्याही मसाल्यांशिवाय खाल्ले तर आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. पण आपण बरेच वेळा उकडलेल्या कडधान्यांमध्ये मसाले टाकून चटपटीत बनवतो.
चटपटीत कडधान्यामुळे पदार्थाला चव तर येते मात्र त्याचे पोषण निघून जाते. त्यामुळे उकडलेले कडधान्य कोणताही पदार्थ न टाकता खा.
तज्ज्ञांचे मत, मोड आलेले कडधान्य तुम्ही कच्चे आणि उकडून दोन्ही पद्धतीने खाऊ शकता. कारण यात पोषण भरपूर असते. मात्र उकडलेले कडधान्यात मसाला घातलात तर त्याचे पोषक घटक निघून जातात.
मोड आलेले कडधान्यांमध्ये प्रथिने, फायबर, खनिजे , व्हिटॅमिन बी आणि फॅटी अॅसिड्स भरपूर असतात. जे तुमच्या शरीराची वाढ होण्यासाठी फायदेशीर ठरतात.
मोड आलेले कडधान्यांचे सेवन केल्यामुळे स्नायू आणि हाडे मजबूत होतात. तसेच रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि थकवा दूर होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.