Dhanshri Shintre
शहराच्या धकाधकीतून सुटका हवी असलेल्या डोंबिवलीकरांसाठी एक शांत, रम्य आणि मन:शांती देणारे ठिकाण आम्ही सुचवत आहोत.
डोंबिवलीकरांसाठी ही सुंदर आणि शांत जागा अगदी जवळच आहे. शहरापासून केवळ अंदाजे ५० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
निसर्ग, ट्रेकिंग आणि शांत वातावरण आवडणाऱ्यांसाठी हे ठिकाण आदर्श आहे. इथे येणाऱ्यांना निसर्गसौंदर्य आणि शांतता अनुभवता येते.
हे ठिकाण म्हणजे कर्जत. हिरवाईने नटलेले, डोंगर-दऱ्यांनी वेढलेले कर्जत शांततेचा आणि निसर्गाचा मनसोक्त आनंद देते.
मुंबई आणि पुणे यांच्या दरम्यान वसलेले हे मोहक हिल स्टेशन हिवाळ्यात धुकं, थंडी आणि हिरवाईने अधिक मनोहारी बनते.
हिरव्या दऱ्या, वाहते झरे, थंड हवा आणि धुक्याचं वातावरण. या सगळ्यामुळे हे ठिकाण हिवाळ्यात स्वर्गासारखं भासू लागतं.
डोंबिवलीहून कर्जतला जाण्यासाठी शिळफाटा, पनवेल आणि चांदणी चौक मार्गे जाणारा ड्राईव्ह रूट अतिशय रमणीय आणि सुंदर अनुभव देणारा आहे.