Surabhi Jayashree Jagdish
मालवण, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक सुंदर किनारपट्टी शहर, पावसाळ्यात अधिकच नयनरम्य आणि हिरवेगार होतं.
या काळात वॉटर स्पोर्ट्स आणि स्कुबा डायव्हिंग सारखे काही पर्याय बंद असले तरी, निसर्गाची हिरवळ, धुके आणि शांतता अनुभवण्यासाठी पावसाळा हा एक वेगळाच अनुभव देतो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा भव्य जलदुर्ग अरबी समुद्राच्या मध्यभागी आहे. पावसाळ्यात समुद्रातील लाटा किल्ल्याच्या तटबंदीवर आदळताना पाहणे हा एक रोमांचक अनुभव असतो.
चिवला बीचजवळ असलेला हा सुंदर बगीचा खडकाळ किनाऱ्यावर बांधलेला आहे. पावसाळ्यात या ठिकाणची हिरवळ अधिकच खुलून दिसते.
तारकर्ली बीचच्या तुलनेत हा कमी गर्दीचा आणि शांत बीच आहे. पावसाळ्यात याठिकाणची पांढरी शुभ्र वाळू आणि हिरवीगार झाडी अधिकच सुंदर दिसते. लाटांचा आवाज ऐकत, पाऊस अनुभवत शांतपणे वेळ घालवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.
मालवणच्या आसपासच्या खाडीकिनारी मोठ्या प्रमाणात कांदळवनाची झाडी आहे. पावसाळ्यात ही झाडी अधिक हिरवीगार आणि छान दिसतात.
कर्ली नदी जिथे अरबी समुद्राला मिळते तो हा संगम पॉईंट. पावसाळ्यात नदी आणि समुद्राच्या पाण्याचा मिलनाचे दृश्य खूप आकर्षक दिसते. आजूबाजूचा परिसर हिरवाईने नटलेला असतो.
पावसाळ्यात समुद्रात जाऊ नका. कारण पावसाळ्यात लाटा खूप मोठ्या असतात आणि समुद्रात उतरणे धोकादायक असू शकते.