Surabhi Jayashree Jagdish
धुळे जिल्हा हा महाराष्ट्राच्या उत्तर भागात वसलेला असून, सातपुडा पर्वतरांगांच्या सान्निध्यात असल्यामुळे पावसाळ्यात इथलं निसर्गसौंदर्य अधिकच खुलतं.
हिरवीगार डोंगररांगा, धबधबे आणि ऐतिहासिक किल्ले यामुळे पावसाळ्यात धुळ्यातील पर्यटन एक वेगळाच अनुभव आहे.
साक्री तालुक्यात आमली गावाजवळ वसलेला हा धबधबा पावसाळ्यात अत्यंत आकर्षक दिसतो. पावसाळ्यात इथल्या पाण्याचा प्रवाह खूपच मनमोहक असतो.
शिरपूर तालुक्यात अनेर नदीजवळ असलेले हे अभयारण्य सुमारे ८३ चौ. किमी. क्षेत्रात पसरलंय. पावसाळ्यात संपूर्ण परिसर हिरवागार होतो आणि वन्यजीव व पक्षी निरीक्षणासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
शिरपूर तालुक्यातील बोराडीजवळ कोडीद गावाजवळ असलेला हा धबधबा पावसाळ्यात प्रवाहित होतो आणि निसर्गरम्य वातावरणामुळे पर्यटकांना आकर्षित करतो. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेली ही जागा हिरवीगार वनराईने नटलेली असते.
धुळे शहरापासून जवळच असलेला नकाणे तलाव हा निसर्गप्रेमींसाठी एक सुंदर आणि शांत ठिकाण आहे. हिरव्यागार वनश्रीने वेढलेला हा तलाव जैवविविधतेने समृद्ध आहे.
धुळे शहरापासून जवळच असलेल्या गाळणा टेकड्यांवर हा ऐतिहासिक किल्ला आहे. पावसाळ्यात किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर हिरवागार होतो आणि किल्ल्यावर ट्रेकिंगचा आनंद घेता येतो.