ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बटाटे कापल्यानंतर त्यांचा हवेशी संपर्क आल्यावर त्यातील एन्झाईम ऑक्सिडेशन होतात त्यामुळे बटाट्यांचा रंग काळपट पडतात आणि चव ही वेगळी लागते.
बटाटे कापल्यानंतर ते स्वच्छ पाण्यात बुडवून ठेवा. बटाटे पाण्यात टाकल्यास हवेशी संपर्क होत नाही आणि त्यामुळे काळपटपणा येत नाही.
पाण्यात चिमूटभर मीठ घालून त्यात बटाटे ठेवल्यास रंग टिकतो. मीठ ऑक्सिडेशन प्रक्रिया कमी करते आणि बटाटे जास्त काळ टिकतात.
पाण्यात लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घातल्यास बटाटे काळे पडत नाही.
बटाटे नेहमी थंड पाण्यात ठेवा. गरम पाण्यात टाकल्यास बटाटे अर्धवट शिजून त्यांचा रंग आणि चव दोन्ही खराब होते.
बटाटे जास्त वेळ उघडे ठेवण्यापेक्षा कापल्यानंतर लगेच त्याची भाजी करावी. यामुळे काळेपणा कमी होण्याची शक्यता असते आणि चवही टिकते.
बटाटे कापताना शक्यतो स्टील किंवा नॉन-कोटेड सुरी वापरा. लोखंडी सुरीमुळे ऑक्सिडेशन वेगाने होते आणि बटाटे लवकर काळे पडतात.
कापलेले बटाटे हवाबंद डब्यात पाण्यासह फ्रिजमध्ये ठेवा. असे केल्यास ते 8 ते 10 तास ताजे राहतात.