ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येक महाराष्ट्रियन घरांमध्ये कांद्याचा वापर केला जातो. कांद्या हा लोक सलाड म्हणून सुध्दा खातात. कांद्याचा वापर हा प्रत्येक एका भाजीत केला जातो.
कांदा खाल्यावर तोंडाला तर वास येतोच पण त्याच बरोबर भांड्यांना सुध्दा कांद्याचा वास येऊ लागतो.कांद्याचा वास भांड्यांना आल्यावर तो काढणे मुश्किल होते.
जर तुमच्या हि भांड्यांना कांद्याचा दुर्गंध येत असेल तर, त्यांना या सोप्या पध्दतीने साफ करा. जाणून घ्या उपाय
भांड्यांना येणाऱ्या कांद्याच्या वासाला घालवायचे असेल तर मीठाचा वापर करावा.
मीठाचे मिश्रण तयार करा आणि त्यात डिर्टर्जेंट मिक्स करा. या मिश्रणाचा वापर करुन भांडी साफ केल्यास वास गायब होईल.
जर स्टिल किंवा प्लास्टिकची भांडी असतील तर अशा भांड्यांना सर्वात आधी लिंबूने घासून घ्या. मग त्यांना डिश वॉशने स्वच्छ साफ करुन घ्या.
जर भांड्यांना कांद्याचा दुर्गंध येत असेल तर तुम्ही सफरचंदाचे व्हिनेगर सुध्दा वापरु शकता.
सफरचंदाचे व्हिनेगर पाण्यामध्ये मिक्स करुन भांड्यांवर ५ मिनिटे टाकून ठेवा. ५ मिनिटांनंतर भांड्यांना पुन्हा साबणाने धुवून घ्या.
कॉफी भांड्यांना असणाऱ्या कांद्याचा दुर्गंध काढून टाकण्यासही मदत करू शकते. कॉफी पाण्यात उकळून भांड्यांना लावा. त्यानंतर त्यांना साबणाने धुवा.
या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या भांड्यांमधून कांद्याचा वास काढून टाकू शकता.