ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिरव्या मिरच्या कापल्यानंतर अनेकांना हाताला आग किंवा जळजळ होते. हि समस्या अनेक गृहिणींना स्वयंपाक करताना जाणवते.तर जाणून घ्या आग झाल्यास काय करावे.
हिरव्या मिरचीत कॅप्सायसिन नावाचा एक रसायनिक घटक असतो. हाच घटक तिखटपणा निर्माण करतो आणि त्वचेला आग येण्यास कारणीभूत ठरतो.
कॅप्सायसिन पाण्यात विरघळत नाही. त्यामुळे मिरची कापल्यावर पाण्याने हात धुतल्यास आग कमी न होता उलट जास्त वाढते.
हाताला आग झाल्यास सर्वात आधी थंड दूध किंवा दही हाताला लावा. हे लावल्याने कॅप्सायसिनचा प्रभाव कमी करण्यास मदत करते.
हाताला थोडे नारळ तेल किंवा कोणतेही घरगुती तेल चोळा तेलामुळे कॅप्सायसिन विरघळते आणि आग कमी होते.
लिंबाचा रस किंवा व्हिनेगर लावल्यास आराम मिळतो. यातील आम्लीय घटक कॅप्सायसिनचा परिणाम कमी करतात.
मिरच्या कापताना हाताला थोडे तेल लावल्यास आग होण्याचा धोका कमी होतो. तसेच हाताला कोरफडीचा गर सुध्दा लावू शकता.
मिरच्या कापल्यानंतर डोळे, चेहरा किंवा नाकाला हात लावू नका. अन्यथा जास्त जळजळ होऊ शकते. योग्य काळजी घेतली तर ही समस्या टाळता येते.