ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मीठ हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जाते.परंतु जर शरीरात सोडियमची कमतरता असेल तर यामुळे आरोग्यावर परिणामही होऊ शकतो.
जर तुम्हाला तुमच्या शरीरात अशी लक्षणे दिसत असतील तर वेळीच सावध व्हा. हे शरीरातील मिठाच्या कमतरतेचे लक्षण आहे.
शरीरात मीठ कमी असल्याने, शरीराच्या पेशी जास्त पाणी शोषून घेतात.
ज्यामुळे आपल्या मेंदूमध्ये सूज येऊ शकते.
मिठाच्या कमतरतेमुळे शरीरात डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते. यामुळे अशक्तपणा आणि चक्कर येऊ शकते.
शरीरात मीठाची कमतरता असल्याने स्नायूंमध्ये वेदना होऊ शकतात.
शरीरात सोडियमच्या कमतरतेमुळे, एखाद्याला अस्वस्थ, चिडचिड आणि राग येऊ शकतो.