ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यामध्ये नेहमी १०१ रुपये दिले जातात.
लग्नासारख्या शुभ कार्यामध्ये आपण पाकीटात कितीही पैसे दिले तरी त्यामध्ये एक रुपयाचा नाणं नक्की ठेवतो.
पण तुम्हाला माहीत आहे का या एक रुपयाच्या नाण्यांच विशेष महत्व काय?
मान्यतेनुसार, एक रुपयांच नाणं दिल्यावर देवी लक्ष्मीचा आशिर्वाद मिळतो.
देवी लक्ष्मीला धातूच्या रुपातही पुजले जाते त्यामुळे प्रत्येक शुभकार्यात एक रुपयाचे नाणं दिल जाते.
ज्योतिष शास्त्रांच्या मते, विषम संख्याना प्रगतिचे प्रतीक मानले जाते. विषम संख्या नेहमी वाढत जाते.
त्यामुळे कोणत्याही शुभ कार्यामध्ये विषम संख्येमध्ये पैसे दिले जातात.
एक रुपयाच्या नाण्याला सुख- समृद्धी आणि सुखी जीवनाचा प्रतीक मानला जातो.
NEXT: मोबाईलचा अतिवापर आरोग्यासाठी ठरेल Dangerous