Sakshi Sunil Jadhav
श्रावणात कमी साहित्यात आणि पोट भरेल असे राजगिऱ्याचे पदार्थ तुम्ही बनवू शकता.
राजगिऱ्याचे पीठ, उकडलेले बटाटे, शेंगदाण्याचा कूट,तूप, हिरवी मिरची, मीठ,दही इ.
सगळ्यात आधी राजगिऱ्याचे पीठ, उकडलेले बटाटे, शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची मीठ एकत्र मळून घ्या.
गरज भासल्यास थोडंसं पाणी घालून पीठ मऊसर मळून घ्या. मग १० मिनिचे झाकून ठेवा.
आता एका प्लास्टिकच्या पिशवीवप लहान पीठाचा गोळा घेऊन लाटा.
तुम्ही केळीच्या पानाला तूप लावून सुद्धा लाटू शकता. मग पराठे तव्यावर शेकवून घ्या.
दोन्ही बाजूला चांगले तूप लावून पराठे शेकवून घ्या.
पराठ्यांसोबत चटणीसाठी दही, शेंगदाण्याचा कूट, मिरची आणि चवीपुरतं मीठ घ्या. गरमा गरम पराठे तयार आहेत.
NEXT : श्रावणात रोज नक्की करा हे ५ उपाय; मिळेल सुख, शांती आणि आर्थिक स्थैर्य