Breaking a Fast with Rice : उपवास सोडताना सर्वात आधी भात का खाल्ला जातो? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक कारणं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रावण उपवास

श्रावण सुरू झाला की, अनेकजण श्रद्धा म्हणून उपवास करत असतात. यावेळी उपवास सोडताना पहिला घास भाताचाच का घेतला जातो? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.

Breaking a fast with rice | Google

धार्मिक आणि वैज्ञानिक कारणं

यामागे जशी धार्मिक कारणं किंवा मान्यता आहेत त्याचप्रमाणे काही वैज्ञानिक कारणंही आहेत.

Religious and scientifc reasons behind eating rice after a fast | Google

सनातन धर्म

सनातन धर्मात भाताला देवी अन्नपूर्णा आणि देवी महालक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे उपवास सोडताना भात खाऊन उपवास सोडला तर लक्ष्मीची कृपा लाभते असे म्हटले जाते.

Annapurna devi symbol of rice | Google

धार्मिक मान्यता

शिवाय देवाला प्रथम भाताचा नैवेद्य दाखवला जातो म्हणून उपवास करणाऱ्या व्यक्तीनेही उपवासाचा शेवट भात खाऊनच करावा अशी धार्मिक मान्यता आहे.

Rice naivedya for god | Google

वैज्ञानिक कारण

पण यामागचे वैज्ञानिक कारण म्हणजे, उपवासात दिवसभरात आपण जास्त काही खाल्लेले नसते. यामुळे पचनक्रिया मंदावलेली असते.

Slow digestive system cause of fasting | Google

पोटाचे आरोग्य

अशावेळी उपवास सोडताना जड अन्नपदार्थ खाल्ले तर, पचनसंस्थेवर ताण पडू शकतो आणि पोटाचे आरोग्य बिघडू शकते. यामुळे उपवास सोडताना प्रथम भात खाल्ला जातो.

bad digestive system | Google

दही भात

काहीजण उपवास सोडताना दही भात खातात. उपवास शक्यतो रात्रीच्या जेवणाने सोडला जातो. रात्री दही खाऊ नये असे म्हटले जाते.

Eat curd and rice while eating fast | Google

तुप आणि जीऱ्याची फोडणी

दह्याला तुप आणि जीऱ्याची फोडणी दिल्यास ते पित्तावर सर्वोत्तम औषध ठरते. यामुळे रात्रीच्या वेळीस देखील दह्याचे सेवन केल्यास ते बाधत नाही आणि अपचन,जळजळ होत नाही.

Curd with ghee and jira phodni | Google

उपयुक्त बॅक्टेरिया

दिवसभराच्या उपवासानंतर दही भात हा एक उत्तम पर्याय आहे. दह्यामध्ये असलेले उपयुक्त बॅक्टेरिया अन्न पचनासाठी सहाय्यक ठरतात.

End your fast with curd and rice | Google

Next : Methichi Bhaji: सोमवारचा उपवास सोडताय? मग घरीच बनवा गावरान स्टाईल 'मेथीची भाजी'

Methichi Bhaji | Social media
येथे क्लिक करा