Manasvi Choudhary
हिंदू धर्मात, श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात अनेक सण-उत्सवाची धामधूम असते.
श्रावणात अनेकजण नॉनव्हेज खाणे टाळतात. मात्र या मागील कारण अनेकांना माहित नाही. ते समजून घेऊया.
श्रावण महिन्यात नॉनव्हेज खाण्यामागील केवळ धार्मिक कारण नसून वैज्ञानिका कारण देखील मानलं जाते.
श्रावण महिना हा प्राण्यांचा प्रजननाचा काळ मानला जातो या काळात मासे व अन्य प्राण्यांची गर्भधारणा होत असते त्यामुळे या काळात मासेमारी केली जात नाही.
वातावरणातील बदलाचा परिणाम थेट आरोग्यावर होतो यामुळे पचनशक्ती देखील बिघडू शकते यामळे मासं, मासे, मटण खाणे याकाळात टाळले जाते.
पावसाळ्यात वातावरणात ओलसर आणि दमटपणा वाढलेला असतो त्यामुळे अशा वातावरणात मासं, मच्छीवर बॅक्टेरिया वेगाने वाढतो त्यामुळे या काळात मासांहार करणे टाळले जाते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.